
अभिषेक शर्माने स्वतःच्या खेळीवर व्यक्त केली नाराजी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिषेकची ही व्यथा पाहून माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला आणि त्यांने कमेंट्स सेक्शनमध्ये फलंदाजाला प्रोत्साहन देत पाठिंबाही दिला. सूर्यकुमार यादवसाठीदेखील हा अत्यंत कठीण काळ आहे. त्यामुळे त्याच्या या पाठिंब्याने अभिषेकला नक्कीच आधार मिळेल असा चाहत्यांचा विश्वास आहे.
Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश
अभिषेक शर्माने व्यक्त केली निराशा
अभिषेक शर्मा स्वतःच्या कामगिरीमुळे निराश दिसला. मालिका संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले, “जेव्हा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकत नाही, तेव्हा दुःख होते. पण जे कठोर परिश्रम करत राहतात, त्यांना क्रिकेट नेहमीच संधी देते. संघ जिंकला याचा मला आनंद आहे. मी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परत येईन.”
सूर्यकुमार यादवने दिला पाठिंबा
माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या पोस्टमागील वेदना समजून घेतली आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यातील आपल्या खेळीची आठवण करून देत, त्याने कमेंट्स सेक्शनमध्ये लिहिले, “गेल्या दोन वर्षांत, तू आपल्या देशबांधवांना चेहऱ्यावर हसू येण्याची अनेक कारणे दिली आहेस. जेव्हा भारताला तुझी सर्वाधिक गरज होती, तेव्हा तू उत्कृष्ट कामगिरी केलीस. ही फक्त वेळेची बाब आहे. स्वतःवर विश्वास ठेव आणि नेहमी निर्भयपणे खेळ.”
सूर्यकुमार यादवच्या या कमेंटनंतर, युजर्सनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. बहुतेक जणांचे म्हणणे आहे की, संघात नसतानाही सूर्या आपल्या सहकारी खेळाडूंची काळजी घेतो, ज्यामुळे तो एक खरा आणि उत्तम लीडर ठरतोय.
IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?
अभिषेक शर्मा खराब फॉर्ममध्ये
झिम्बाब्वेविरुद्धची टी२० मालिका सुरू होण्यापूर्वीच अभिषेक शर्मा संघर्ष करत होता. त्याने आयर्लंडविरुद्ध ४९ आणि ० धावा केल्या. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्ध ५९, ४३, १०, १६ आणि ३ धावा केल्या. त्यानंतर त्याने १, ८ आणि २ अशा गुणांसह झिम्बाब्वे दौरा संपवला. याचा अर्थ असा की, तो त्याच्या शेवटच्या १० सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला आहे, ज्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे. अभिषेक शर्मा स्वतःदेखील आपल्या कामगिरीवर अजिबात आनंदी नाही हेच त्याच्या या पोस्टमधून दिसून येत आहे. मात्र तो नक्कीच धडाक्यात पुनरागमन करेल असा अनेकांना विश्वास आहे.