
अभिषेक शर्माबाबत अनिल कुंबळेचे महत्त्वाचे विधान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अनिल कुंबळे यावेळी म्हणाला की, “मी त्याची तुलना वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूशी करेन, कारण तो प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा तो कसोटी क्रिकेटमधून एकदिवसीय क्रिकेट आणि नंतर टी-२० क्रिकेटमध्ये आला, तेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याला आपल्या खेळीची गती थोडी वेगळ्या पद्धतीने ठेवावी लागेल.”
पॅट कमिन्सच्या फिटनेसने वाढवली चिंता, SRH चे नेतृत्व करणार Abhishek Sharma? IPL 2026 मध्ये काय घडणार
मुलाखतीत केले विधान
जिओ स्टारला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनिल कुंबळेने आपले मत मांडले यावेळी तो म्हणाला की, “पण सेहवाग तरीही १४०-१५० च्या स्ट्राइक रेटने खेळायचा. अभिषेक शर्माने त्याबद्दल विचार करायला सुरुवात केली पाहिजे.” त्याने स्वतःला विचारायला हवं, ‘मी २०० च्या स्ट्राईक रेटने धावा करत आहे, अपेक्षा खूप जास्त आहेत, तर मग आता मी ३०० च्या स्ट्राईक रेटने खेळावं का?’ तुम्हाला फक्त सामान्य राहायचं आहे. तुम्हाला शक्य तितके जास्त चेंडू खेळायचे आहेत.’
कुंबळेच्या मते, ‘जर अभिषेक शर्मा एका डावात २० चेंडू खेळला, तर तो ५० धावांच्या जवळ पोहोचेल हे आपल्याला माहीत आहे. आपण संजू सॅमसनच्या बाबतीतही हेच पाहिलं आहे; तो ४० किंवा ५० धावांवर बाद होत नाही, उलट डाव पुढे नेतो आणि ८५-९० धावांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे त्याचा डाव अविस्मरणीय ठरतो.’
अभिषेकच्या खेळाकडून परिपक्वतेची गरज
कुंबळे यावेळी म्हणाला की, ‘टी२० फॉरमॅटमध्ये अशाच प्रकारच्या फलंदाजीची गरज असते. कदाचित या हंगामात तुम्हाला अभिषेककडून अशीच परिपक्वता पाहायला मिळेल, ज्याची सनरायझर्स हैदराबादलाही अपेक्षा असेल.’ अभिषेकचा टी२० विश्वचषकातील प्रवास खराब होता, आणि आता तो २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे.
अभिषेकने स्वतः हे मान्य केले होते आणि आता आयपीएल सुरू होत असून अनेकांची अभिषेककडून अपेक्षा आहे. यामुळे अभिषेकने अत्यंत परिपक्वतेने हे हाताळावे आणि त्यानुसार खेळावे असेच यावेळी कुंबळेनेदेखील म्हटले आहे.