अभिषेक शर्मा पुन्हा अयशस्वी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म हा चर्चेचा विषय राहिला आहे आणि अगदी सेमीफायनलमध्येही अभिषेकच्या बॅटची जादू चालू शकली नाही. वानखेडेवरील चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत. दरम्यान आता अभिषेकला नक्की का खेळवलं जात आहे असाही प्रश्न निर्माण झालाय. अत्यंत चुकीच्या शॉटची निवड करून अभिषेक आऊट झाला.
अभिषेक विली जॅक्सच्या जाळ्यात अडकला
अभिषेक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने डावाच्या सुरुवातीला दोन चौकार मारले, परंतु त्याने विल जॅक्सविरुद्ध खराब शॉट खेळला ज्यामुळे त्याचा डाव संपला. जॅक्सने ८५.४ किमी/तास वेगाने मंद, इनकमिंग चेंडू टाकला. अभिषेकने त्याच्या क्रीजमधून बाहेर पडून लेग-साईडकडे एरियल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे टायमिंग इतके खराब होते की चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या भागात लागला. डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या फिल सॉल्टने एक साधा कॅच घेतला. इंग्लंडच्या जाळ्यात अभिषेक अडकला
योग्य टायमिंग असल्यास गेली असती 6
अभिषेकला बाद करणारा चेंडू योग्य होता, पण त्याचे फूटवर्क आणि टायमिंग अजिबातच त्याला साथ देत नव्हते. जर त्याचे टायमिंग थोडेसे चांगले असते तर याच चेंडूवर सहा धावा नक्कीच मिळाल्या असत्या. बाद झाल्यानंतर अभिषेकच्या चेहऱ्यावरचा पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता, कारण सेमीफायनलसारख्या मोठ्या स्टेजवर असा बेजबाबदार फटका संघाला महागात पडला आहे. कोणत्याही स्पर्धेत अभिषेक चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. केवळ एक सामन्यात त्याने ५५ धावा केल्या आहेत.
संपूर्ण विश्वचषकात फ्लॉप शो, फक्त एक अर्धशतक
हा विश्वचषक अभिषेक शर्मासाठी एक दुःस्वप्न ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव अर्धशतकाचा अपवाद वगळता, तो संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करत आहे. विशेषतः ऑफ-स्पिनर्सविरुद्धच्या त्याच्या कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सेमीफायनलसारख्या नॉकआउट सामन्यात सलामीवीराकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती, परंतु अभिषेकने पुन्हा एकदा निराशा केली. यामुळे आता भारत फायनलला आल्यास खरंच अभिषेकला खेळवणं योग्य होईल की नाही अशीही चर्चा सुरू झाली आहे.






