
सप्टेंबर महिन्यात भारताचा बांग्लादेश दौऱ्य होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामने आणि तीन टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. मात्र अद्याप या दौऱ्याची अधिकृत घोषणा बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने केलेली नाही. भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर येईल अशी अपेक्षा बांग्लादेश बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत
टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये बांग्लादेशच्या संघाने सहभाग घेतला नव्हता. तेव्हापासून भारत अन् बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे भारत बांग्लादेशमध्ये भारतीय संघ क्रिकेट दौऱ्यावर जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता ही सिरिज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड यावर काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल म्हणाले. ‘सुदैवाने माझ्याकडे भारताच्या सिरिजबाबत सध्या अधिकृत माहिती नाहीये. मात्र मी बीसीसीआयच्या संपर्कात आहे. दोघांमध्ये ईमेल द्वारे चर्चा सुरू आहे. बांग्लादेश हा एक सुरक्षित देश असून भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर येईल असा मला पूर्ण विश्वास आहे.
क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी
दरम्यान बांग्लादेशचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तिथे तो दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाने 2027 च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.