
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय महिला संघाची विश्वचषकादरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका झाली यामध्ये भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघात दोन नवीन खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. अनुष्का शर्मा आणि काश्वी गौतम या दोन नवीन खेळाडू आहेत. निवड समितीने त्यांना भारताच्या टी-२० संघात पहिल्यांदाच स्थान दिले आहे.
अनुष्का शर्मा एक फलंदाज आहे, तर काश्वी गौतम एक मध्यमगती गोलंदाज आहे. काश्वीने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे, तर अनुष्का शर्माची कोणत्याही फॉरमॅटमध्ये निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. काश्वीने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळले आहे, तर अनुष्का शर्माला देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव असून तिने यावर्षी महिला प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला होता, ज्यात तिने गुजरात जायंट्स संघाकडून सात सामन्यांमध्ये १७७ धावा केल्या होत्या.
भारतीय संघ १७ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने तीन शहरांमध्ये खेळले जातील. पहिले दोन सामने डर्बनमध्ये, त्यानंतर दोन सामने जोहान्सबर्गमध्ये होतील. अंतिम सामना बेनोनी येथे खेळला जाईल. पहिला सामना १७ एप्रिल रोजी, दुसरा १९ एप्रिल रोजी, तिसरा २२ एप्रिल रोजी, चौथा २५ एप्रिल रोजी आणि पाचवा २७ एप्रिल रोजी खेळला जाईल.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उपकर्णधार), शैफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेट कीपर), अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांति गौड़, श्री चरणी, श्रेयंका पाटिल, काश्वी गौतम, भारती फुलमाली, उमा छेत्री (विकेट कीपर) आणि अनुष्का शर्मा
🚨 𝗦𝗾𝘂𝗮𝗱 𝗔𝗻𝗻𝗼𝘂𝗻𝗰𝗲𝗺𝗲𝗻𝘁 🚨 Here’s a look at #TeamIndia‘s squad for the 5️⃣-match T20I series against South Africa 🙌 Details ▶️ https://t.co/GpzX5MiEDp#SAvIND pic.twitter.com/5tEP7x4HnZ — BCCI Women (@BCCIWomen) March 24, 2026
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६, १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला जाणार आहे. या भव्य स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघासाठी प्रत्येक टी-२० मालिका आता अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता आणि आता हरमनप्रीत कौर व तिच्या सहकाऱ्यांचे लक्ष्य टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावण्याचे असेल. म्हणूनच नवीन खेळाडूंना संधी दिली जात आहे.