वैभव सूर्यवंशी (फोटो- सोशल मीडिया)
दुसऱ्या सामन्यात विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. संजूने दाखवलेल्या आक्रमक खेळाच्या जोरावर त्याला तिसऱ्या सामन्यातून वगळणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा बेंचवरच बसावे लागण्याची चिन्हे आहेत.
IND Vs AFG: रेड्डीने पठाणांना अक्षरश: झोपवलं! भारताला सिरिज जिंकण्यासाठी 160 रन्सची आवश्यकता
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना १७ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आता या अंतिम सामन्यात संघ व्यवस्थापन काही अनपेक्षित बदल करून वैभवला संधी देते की संजू सॅमसनवरच पुन्हा विश्वास दाखवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्मा मोठी धावसंख्या उभारू शकला नसला, तरी पहिल्या सामन्यातील त्याचे तुफानी अर्धशतक आणि त्याची आक्रमक शैली पाहता त्याचे स्थान पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हीच जोडी पुन्हा एकदा सलामीला उतरण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत दमदार फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनमुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेव्हन मधील प्रवेश अधिक कठीण झाला आहे.
अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान/नवीन-उल-हक, नूर अहमद, फजलहक फारुकी.
IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.






