
hockey world cup 2026
बेल्जियमने भारतीय पुरुष हॉकी संघाचा एफआयएच हॉकी वर्ल्डकपमध्ये 4-3 अशा फरकाने पराभूत केले आहे. शेवटच्या सामन्यात देखील झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाने ही वर्ल्ड कप स्पर्धा 8 व्या स्थानावर राहून संपवली आहे. भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन तर अभिषेकने एक गोल केला. बेल्जियमच्या चांगल्या बचावामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला.
The Indian Men’s Team took on Belgium in their final game of the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026, drawing 3–3 before narrowly going down 3–4 in the shootout in the 7th/8th place clash. 🏑 Here are the moments from a hard-fought final game of the campaign. 🇮🇳… pic.twitter.com/1qG7JmMOBV — Hockey India (@TheHockeyIndia) August 28, 2026
भारतीय संघाने या सामन्याची अत्यंत धमाकेदार सुरुवात केली. 6 व्या मिनिटाला अभिषेकने गेलेल्या गोलमुळे भारतीय संघाने आपले खाते उघडले. मात्र मैदानावार 11 पेक्षा जास्त खेळाडू असल्याच्या कारणाने हरमनप्रीत सिंगला यलो कार्ड दाखवण्यात आले. त्याला 5 मिनिटे बाहेर बसावे लागले. बेल्जियमच्या संघाने अनेक पेनल्टी शूटआउटमध्ये गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या खेळाडूंनी बेल्जियमला एकही गोल करून दिला नाही. पहिल्या सत्रात बेल्जियम एक गोल देखील करू शकली नाही.
दरम्यान दुसऱ्या सत्रात बेल्जियमने चांगला खेळ केला. 22 आणि 23 व्या मिनिटाला लागोपाठ 2 गोल बेल्जियमने केले आणि सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. तर 31 व्या मिनिटाला भारतीय कर्णधाराने पेनल्टी कोर्नरमध्ये गोल करत सामना बरोबरीत आणून ठेवला. या सामन्याचा शेवट अत्यंत रोमहर्षक असा झाला. 57 व्या मिनिटाला निकोलस डी केरपेलच्या गोलमुळे बेल्जियमने पुन्हा आघाडी घेतली. सामना संपण्यासाठी अवघे काही सेकंड शिल्लक असताना भारताच्या कर्णधाराने गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणून ठेवला.
एफआयएच पुरुष हॉकी वर्ल्डकपमध्ये 51 वर्षांनी पदक जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात भारतीय संघाची सुरुवात धमाकेदार झाली होती. मात्र पहिल्या फेरीत भारतीय संघाने चांगले यश प्राप्त केले होते. मात्र दुसऱ्या फेरीत लागोपाठ पराभव झाल्याने भारताचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. भारताने ही स्पर्धा शेवटच्या म्हणजे 8 व्या स्थानावर राहिला आहे. या संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने अत्यंत चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या प्रयत्न अपयशी ठरले. तो भारताला फायनलपर्यंत नेऊ शकला नाही.