
नुकतीच भारतीय संघात टी 2 सिरिज पार पडली. या सिरिजमध्ये भारताचा सपशेल पराभव झाला होता. इंग्लंडने 4-0 ने मालिका जिंकली होती. कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वनडे सिरिजमध्ये देखील भारताचा पराभव होणार की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र कर्णधार आणि संघ बदलताच भारतीय संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. इंग्लंडचे आजचा सामना जिंकल्यास मालिका बरोबरीत येईल. तर भारताने आजचा सामना जिंकल्यास मालिका भारतीय संघ जिंकणार आहे.
पहिल्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने 80 रन्सची शानदार खेळी केली. मात्र दुखापतीमुळे त्याला त्याचा खेळ थांबवावा लागला. त्यानंतर अक्षर पटेलने शानदार अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीत देखील 4 विकेट्स घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. मात्र पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 11 रन्स करून आउट झाला. तर विराट कोहली 5 रन करून आउट झाला. त्यामुळे आजच्या सामन्यात दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
मागील सामन्यात शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांनी चांगली खेळी केली. केएल राहुलने देखील शानदार विकेटकीपिंग केल्याचे दिसून आले. क्षेत्ररक्षण देखील भारतीय संघाने कमालीचे केल्याचे पाहायला मिळाले.
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?
इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.