
कर्नाटकच्या 'या' खेळाडूची एक्झिट (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Delhi Beat Kolkata: दिल्लीचा अखेरच्या सामन्यात विजय; ईडन गार्डन्सवर कोलकाताचा ४० धावांनी धुव्वा
एस. एल. अक्षय यांचे आकस्मिक निधन
२०१४-१५ च्या हंगामात रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या कर्नाटक संघाचा एस. एल. अक्षय एक भाग होते. त्यांनी २०११ ते २०१३ या काळात कर्नाटकसाठी सहा प्रथम-श्रेणी, तीन लिस्ट-ए आणि नऊ टी-२० सामने खेळले. याच काळात त्यांनी के. एल. राहुल आणि मनीष पांडे यांसारख्या स्टार खेळाडूंसोबत आपला शेवटचा प्रथम-श्रेणी सामना खेळला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनानुसार, “अक्षयने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही, त्याने पूर्ण समर्पण आणि उत्कटतेने क्रिकेटची सेवा करणे सुरू ठेवले.
कारकीर्द संपुष्टात आल्यावरही क्रिकेटसाठीच झटला
खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही अक्षय क्रिकेटमध्ये सक्रिय होता. त्याने कनिष्ठ स्तरावर प्रशिक्षण दिले आणि कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघासोबत काम केले. तरुण खेळाडूंचे संगोपन आणि मार्गदर्शन करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अक्षयचे निधन केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कर्नाटक क्रिकेट समुदायासाठी एक मोठा धक्का आहे.”
एस एल अक्षय हा सध्याच्या घडीला टॉप खेळाडू असणारे मनिष पांडे आणि के एल राहुल यांच्यासहदेखील खेळला होता. दरम्यान अशा अचानक जाण्यामुळे सर्वच खेळाडूंना हा मोठा धक्का आहे. अवघ्या ३९ व्या वर्षी अक्षयने जगाचा निरोप घेतला असल्यामुळे सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे.