
मुंबई इंडियन्सचा सलग 4 था पराभव
हार्दिक पंड्या अन् बुमराहचा व्हिडिओ आला समोर
हार्दिक पंड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी
Tata IPL Hardik Pandya Vs Jaspreet Bumrah: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पर पडला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 196 रन्स करून पंजाबला 196 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र पंजाब किंग्जने ते टार्गेट सहजरीत्या पूर्ण केले. यामुळे मुंबईचा सलग 4 था पराभव झाला आहे. मात्र आता स्टेडियमवर कर्णधार हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावरून दोघांमध्ये वाद झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सूर गवसलेला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे मुंबईचा सलग 4 था पराभव झाला आहे. त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण तापले असल्याची चर्चा आहे त्यातच आता हार्दिक अन् बुमराहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे दोघांमध्ये काही वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहमध्ये बाचाबाची झाल्याचे म्हटले जात आहे. बुमराह आपल्या गोलंदाजी दरम्यान वैतागलेला दिसत आहे. तो कर्णधार पंड्यावर वैतागलेला दिसत आहे, असे म्हटले जात आहे. बुमराहला हवी असलेली फिल्डिंग हार्दिक न लावता त्याच्या मनाप्रमाणे फिल्डिंग लावल्याने बुमराह नाराज असल्याचे दिसत आहे. चेहऱ्यावरील भाव पाहता तो पंड्याच्या निर्णयावर खुश नसल्यासारखे वाटत आहे.
Fight between IPL star Bumrah & Pandya.. pic.twitter.com/qZqL3sPUCh — Indian Fight Club (@INDFightClub) April 17, 2026
मुंबई इंडियन्सचा 4 था पराभव
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा 24 वा सामना पार पडला. पंजाब किंग्जने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी
पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी
सामन्यानंतर प्रसारकाशी बोलताना हार्दिक पांड्या म्हणाला, “खरं सांगायचं तर, सध्या माझ्याकडे जास्त काही बोलण्यासारखं नाही. मला वाटतं की, आम्हाला खरोखरच मागे जाऊन आमच्या रणनीतीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि आमच्याकडून कुठे चूक होत आहे हे पाहण्याची गरज आहे. ही चूक एका खेळाडूमुळे आहे का? संपूर्ण संघामुळे आहे का? की आमच्या नियोजनाच्या अभावामुळे आहे? आम्ही पुढच्या सामन्यापूर्वी हे शोधून काढू आणि पुढे काय करता येईल ते पाहू.”