
india vs pakistan
भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांच्या देशात जाऊन खेळण्यास तयार नाहीत. पाकिस्तान सातत्याने भारताला त्रास देत असतो. दहशतवादी कारवाया भारतात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक समोर आले आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये सिरिज खेळवणे शक्य झालेले नाही.
T20 World Cup 2026: सेमी फायनलमध्ये पुन्हा होणार भारत – पाकिस्तान टक्कर, कसे आहे गणित?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही सिरिज न खेळवली गेल्याच भारतावर म्हणजे बीसीसीआयवर कसलाही फरक पडलेला नाहीये. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र आता पाकिस्तानच्या आशा उंचावल्या आहेत. या चालू महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजेच आयसीसीचे एक सेमिनार आयोजित केले जाणार आहे. त्यामध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सिरिज खेळवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी नव्या पर्यायांवर विचार असल्याचे समजते आहे. मात्र 2013 नंतर दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे एकही परस्पर मालिका झालेली नाही. सध्या हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी केवळ ICC च्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमनेसामने येताना दिसतात. त्यामध्ये देखील भारताचे पारडे अत्यंत जड असल्याचे पाहायला मिळत आहे. जर ही मालिका पुन्हा सुरू झाली, तर ती टी-२० फॉरमॅटमध्ये होणार की वन-डे फॉरमॅटमध्ये, हे अद्याप अस्पष्ट आहे.
आयसीसीने जारी दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्याची भूमिका घेतली तरी अंतिम निर्णय हा बीसीसीआय आणि भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. मजत्र सध्या परिस्थिती पाहता भारत सरकार दोन्ही देशांमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी देऊ शकते असे वाटत नाही. यामुळे भारताला कोणताही फरक पडणार नसून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डला नुकसान सहन करावे लागणार आहे.