
TG20 लीगवर मोठा वाद; विजय देवरकोंडा, सिराज आणि तिलक वर्माला कायदेशीर नोटीस
बुधवारी (दि. १७) महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २०९ धावा केल्या. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा या दोघींनी अर्धशतके झळकावली. २१० धावांच्या लक्ष्याला पाठलाग करताना, नेदरलँड्सचा संघ पूर्ण १० षटके फलंदाजी करू शकला नाही आणि ११४ धावांवर सर्वबाद झाला.
ही घटना नेदरलँड्सच्या डावाच्या सहाव्या षटकात घडली, जेव्हा श्रेयंका तिचे पहिले षटक टाकण्यासाठी आली होती. फलंदाज फोबी मोल्केनबोअरने एक हलका चेंडू लेग साईडला खेळला. श्रेयंका पटकन चेंडूच्या दिशेने गेली आणि तो उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि तिच्या उजव्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. वेदना इतक्या तीव्र होत्या की ती स्वतःच्या पायावर उभीही राहू शकली नाही. फिजिओ मैदानावर पोहोचले, पण दुखापतीची तीव्रता पाहता श्रेयंकाला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. तिच्या जागी शफाली वर्माने त्या षटकातील उरलेले पाच चेंडू टाकले. या दुखापतीमुळे श्रेयंका संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
सामनावीर शफाली वर्माने श्रेयंका पाटीलच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, “तिला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. बीसीसीआयचे डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत.” तिच्या दुखापतीच्या तीव्रतेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी, ज्या पद्धतीने ती मैदानाबाहेर गेली, त्यामुळे भारतीय संघासाठी निश्चितच चिंता वाढली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रकरणी एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, ‘नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना श्रेयंका पाटील जखमी झाली. यानंतर, तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर बाहेर नेण्यात आले. श्रेयंका लवकरात लवकर बरा व्हावा अशी आमची प्रार्थना आहे.’
🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 Shreyanka Patil picked up an injury while attempting to field the ball and was stretchered off the field. We wish her a speedy recovery as we wait for further updates. pic.twitter.com/k7upvdRDJh — BCCI Women (@BCCIWomen) June 17, 2026
भारतीय संघाने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले असून सध्या तो ‘अ’ गटात अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ६४ धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सला ९५ धावांनी पराभूत केले. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्धच्या आगामी सामन्यांपूर्वी भारतीय संघासाठी श्रेयंकाची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे.