
Jaspal Rana: भारतीय शूटिंगचा ‘गोल्डन बॉय’ हरपला; जसपाल राणा यांचे 49 व्या वर्षी निधन
इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया आपली सातवी ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय ठेवेल. दरम्यान, इंग्लंडने २००९ पासून एकही टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळी पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे भारताची स्पर्धेतील सुरुवातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात आज फक्त एकच सामना खेळला जाईल. यजमान इंग्लंडचा सामना बर्मिंगहॅममध्ये श्रीलंकेशी होईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ११:०० वाजता सुरू होईल. हेड टू हेडच्या आकडेवारीमध्ये इंग्लंडचा महिला संघ श्रीलंकेपेक्षा खूप पुढे आहे. गेल्या १२ टी२० सामन्यांमध्ये इंग्लंडने श्रीलंकेच्या संघाला १० वेळा पराभूत केले आहे.
भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅममधील एड्जबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. हा सामना भारत-पाकिस्तान सामना या दोन्ही संघांसाठी विश्वचषकातील पहिलाच सामना असेल. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही संघ निर्भय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताचा समावेश ग्रुप ‘ए’ मध्ये करण्यात आला आहे. या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांसारखे संघ आहेत. त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.