७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने अधिकृत माघार घेतली आहे. त्यामुळे आता या टी-२० विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची निवड करण्यात आली आहे.
अखेर बांगलादेश क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषका २०२६ मध्ये खेळताना दिसणार नाही. आयसीसी रँकिंगनुसार, स्कॉटलंडची बांगलादेशचा बदली संघ म्हणून स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
२१ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या पाच सामन्यांची T20 मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
भारताचा स्टार अनुभवी खेळाडू रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील पुढील सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून तिलक वर्माला पसंती दिली असून त्याच्या मते तिलक वर्माचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
आयसीसीकडून बांगलादेशला २०२६ चा टी२० विश्वचषक सुरळीत पार पडेल असे आश्वासन देण्यात आले आहे. बीसीबीने सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी आयसीसीसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे.
टी-२० विश्वचषकापूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केले आहे. दासुन शनाकाकडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
शुभमन गिलला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गिलला त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले असून गेल्या दीड वर्षात संघात मोठे बदल झालेले दिसत आहेत.
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज इशान किशनची २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यानंतर इशान किशनचे वडील प्रणव पांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी त्यांच्या संघाच्या भारत दौऱ्याचे वर्णन 'अत्यंत यशस्वी' असे करताना पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा येणार असे म्हटले…
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया कपनंतर टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील.