Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवट गोड! मालिकेत कोण ठरलं रनमशिन?कुणी टिपले सर्वाधिक बळी? जाणून घ्या…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेत काही खेळाडू आपल्या फलंदाजीने तर काही गोलंदाजीने चमकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 08, 2025 | 07:31 PM
IND vs AUS: India's sweet ending against Australia! Who was the run machine in the series? Who took the most wickets? Find out...

IND vs AUS: India's sweet ending against Australia! Who was the run machine in the series? Who took the most wickets? Find out...

Follow Us
Close
Follow Us:

IND vs AUS:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा शेवट रोमांचक पद्धतीने झाला.  हवामानामुळे मालिकेत वारंवार व्यत्यय देखील आला. या मालिकेत भारतीय संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत मालिका २-१ ने जिंकली. या मालिकेतील दोन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेले. शनिवारी ब्रिस्बेनच्या गॅबा येथे मालिकेतील शेवटचा आणि पाचवा टी २० सामाना खेळला गेला. या सामन्यात पावसाने व्यत्यय आल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला.

पावसाने अंतिम सामना वाया गेला

गॅबा येथे खेळवण्यात आलेल्या पाचव्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामी जोडी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला उत्तम सुरुवात करून दिली. ४.५ षटकांत एकही विकेट न गमावता भारताने ५२ धावा केल्या होत्या. शुभमन गिलने उत्कृष्ट फॉर्म  दाखवत चौकार मारले, तर अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रेक्षकांचे पुन्हा एकदा चांगले  मनोरंजन केले. तथापि, वीज आणि वादळामुळे खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पंचांकडून जवळजवळ दोन तास वाट पाहिल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : ‘यापुढे शोमध्ये क्रिकेटपटूला आमंत्रण नाही…’, करण जोहरचा विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा, कारण बनले ‘हे’ खेळाडू

अभिषेक शर्मा भारताचा हुकूमी एक्का

अंतिम सामना पूर्ण झाला नसला तरी, या मालिकेत भारताने बाजी मारली. या मालिकेत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची कामगिरी उत्कृष्ट राहिली. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले. अभिषेकने पाच सामन्यांमध्ये ४०.७५ च्या सरासरीने १६३ धावा फटकावल्या आणि तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने अर्धशतक देखील झकळवले आहे. तसेच त्याने १८ चौकार आणि ६ षटकार देखील ठोकले.

शुभमन गिलनेची प्रतिभा दिसली..

अभिषेक शर्मासोबत, सलामीवीर शुभमन गिलने देखील  सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्याने पाच सामन्यांमध्ये ४४ च्या सरासरीने १३२ धावा केल्या आहेत. गिल आणि अभिषेक हे मालिकेत १०० पेक्षा जास्त धावा करणारे एकमेव दोन भारतीय फलंदाज ठरले.

नाथन एलिस आणि वरुण चक्रवर्ती यांचा गोलंदाजीमध्ये दबदबा

गोलंदाजीच्या बाबत बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नाथन एलिसने शानदार कामगिरीचे दर्शन  घडवत दबदबा राखला.   ५ सामन्यांमध्ये त्याने ९ बळी घेतले. त्याने १४.२ षटकांत फक्त ११५ धावा दिल्या आणि अनेक वेळा भारतीय फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले.   वरुण चक्रवर्ती हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. टी-२० फॉरमॅटमधील नंबर वन स्पिनर असणाऱ्या वरुणने  ५ बळी घेतले आणि १२ षटकांत ८२ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने देखील ४ बळी घेतले आणि पॉवरप्लेमध्ये प्रभावी गोलंदाजीचे दर्शन दिले.

हेही वाचा : IND A vs SA W : दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी, ध्रुव जुरेलने दाखवला दम! झळकवली सलग दोन शतके

 

Web Title: Ind vs aus india wins five match t20 series against australia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND VS AUS
  • T20 cricket
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

IPL 2026 : विराट कोहली, श्रेयस अय्यर ते तिलक वर्मापर्यत: आयपीएल 2026 मध्ये कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप?
1

IPL 2026 : विराट कोहली, श्रेयस अय्यर ते तिलक वर्मापर्यत: आयपीएल 2026 मध्ये कोणाच्या हाती लागणार ऑरेंज कॅप?

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा
2

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.