
photo- social media
FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत
भारताच्या विजयामुळे एडजबॅस्टन येथील इंग्लंडच्या प्रभावी विक्रमालाही पूर्णविराम मिळाला. २०१५ नंतर या मैदानावर इंग्लंडला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी, २०१४ मध्ये एडजबॅस्टन येथे एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा शेवटचा संघ होता. आता, २०२६ मध्ये देखील भारतीय संघाने पुन्हा एकदा इंग्लंडला धूळ चारली.
या विजयासह, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध आपला सलग सहावा एकदिवसीय विजय नोंदवला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताची ही सर्वात मोठी विजय मालिका आहे. यापूर्वी, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सलग ५ एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफमध्ये खेळला जाईल, जिथे भारत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड देखील पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
Job completely done in style ✅#TeamIndia cruise to a 6️⃣-wicket victory to take a 1-0 lead in the ODI series 💙 Scorecard ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/PnUDkcVLyr — BCCI (@BCCI) July 14, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडची सुरुवात आक्रमक होती. परंतु, काही षटकांनंतर बारतीय गोलंदाजांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली. सलामीसाठी आलेले बेन डकेट आक्रमकपणे फलंदाजी करत होता, पण दुसऱ्या टोकाला जेकब बेथेल १४ धावांवर बाद झाला. गुरनूर ब्रारने त्याला बाद केले. त्यानंतर ब्रारने बेन डकेटलाही ४३ धावंवर बाद केले. इंग्लंडची मधली फळी पूर्णपणे कोसळली. कर्णधार ब्रुकने १, बटलरने ५ धावा केल्या आणि करनला आपले खाते उघडता आले नाही. परंतु, जो रूटच्या नाबाद ७६ आणि लियाम डॉसनच्या ६८ धावांनी इंग्लंडला सामन्यात परत आणले. या दोघांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडला २५० धावांच्या पुढे नेले. इंग्लंडने भारतासमोर ४७.५ षटकांत २५८ धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात भारताची सुरुवातही खराब झाली. रोहित शर्मा ११ धावांवर आणि विराट कोहली अवघ्या ५ धावांवर बाद झाला. मात्र, कर्णधार शुभमन गिलने श्रेयस अय्यरसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. गिलने ७५ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या, पण तो दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. गिल बाहेर गेल्यानंतर अय्यर ३५ धावांवर धावबाद झाला. राहुललाही केवळ १ धाव करता आली. पण यानंतर, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी शानदार फलंदाजी करून इंग्लंडला पराभूत केले. अक्षर पटेलने अवघ्या ३८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरनेही ६३ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.