IND vs ENG: Virat-Rohit will be seen together in Lord's Test; Big update coming soon..
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना सध्या एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय खेळत आहेत. अशा परिस्थितीत आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चाहत्यांना आठवण येत आहेत. पण आता चाहत्यांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत, या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टेडियममध्ये एकत्र दिसण्याची शक्यता असल्याची बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही खेळाडू सध्या इंग्लंडमध्येच आहेत. जर असे झाले तर लॉर्ड्सवमध्ये दोघांची उपस्थिती सामन्याचा थरार वाढवणारी असणार आहे.
हेही वाचा : IND vs ENG : कधी सुधारणार ऋषभ पंत, बुमराह-सिराजचं हसु अनावर! तुम्ही पाहिला का Video?
विराट आणि रोहित यांच्याबाबत येत असलेल्या बातम्यांमध्ये म्हटले आहे क, तिसऱ्या कसोटी सामन्यात बीसीसीआय या दोन्ही खेळाडूंना लॉर्ड्समध्ये येण्याचे आमंत्रण देण्याची शक्यता आहे. जर ही बाटमोई खरी ठरली तर रोहित-विराटच्या चाहत्यांची तेथे उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. रोहित शर्माने टेस्ट कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर शुभमन गिल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहितनंतर त्याच्या विराटने देखील कसोटी क्रिकेटला निरोप दिला.
🚨ROHIT & VIRAT COMING FOR LORD’S TEST MATCH 🚨
“Both Rohit Sharma and Virat Kohli are currently in London. BCCI may invite both of them to watch the third Test match to be held at Lord’s Cricket Stadium.” pic.twitter.com/DK35PDhVDR
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) July 5, 2025
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या योगदानाने टीम इंडियाने मोठ-मोठे सामने जिंकले आहेत. रोहित शर्माने टीम इंडियासाठी एकूण ६७ कसोटी सामने खेळले असून त्याने ४३०१ धावा केल्या आहेत. त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये १ द्विशतक, १२ शतके आणि १८ अर्धशतके आहेत.
हेही वाचा : ENG vs IND : U19 भारतीय संघाची नजर चौथ्या विजयाकडे! वाचा कधी काही कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming
विराट कोहलीबद्दल सांगायच झाल्यास तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एक उत्तम खेळाडू असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने टीम इंडियासाठी एकूण १२३ सामने खेळले आणि त्यामध्ये त्याने ९२३० धावा केल्या. या दरम्यान त्याने ३० शतके आणि ७ द्विशतके लगावली आहेत. जर त्याला हवे असते तर तो कसोटी स्वरूपात १०००० धावा पूर्ण करू शकला असता, परंतु त्याने अचानक कसोटीला अलविदा केले.