
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
ईडन गार्डन्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. १२४ धावांचे लक्ष्य ठेवूनही टीम इंडिया फक्त ९३ धावांतच गारद झाली. असा पराभव कुणालाही अपेक्षित नव्हता. चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना लक्ष्य केले.
माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या पराभवावर संताप व्यक्त केला. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून त्यांनी टीम इंडियाच्या निवडीवर आणि त्यांच्या खराब कसोटी रेकॉर्डवर टीका केली. ते म्हणाले, “आम्ही व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, परंतु या नियोजनामुळे, आम्ही स्वतःला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल संघ म्हणू शकत नाही. संघ निवड स्पष्टतेशिवाय केली जाते आणि जास्त विचार करणे महागात पडले आहे. इंग्लंडविरुद्धच्या अनिर्णित मालिकेचा अपवाद वगळता, गेल्या वर्षभरात भारताचे कसोटी क्रिकेटचे निकाल खराब राहिले आहेत.”
ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली आणि गौतम गंभीरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की त्याने अशाच प्रकारची खेळपट्टीची विनंती केली होती. त्याने या चुकीसाठी भारतीय फलंदाजांना जबाबदार धरले. फिरकीपटूंना अनुकूल असलेली खेळपट्टी तयार करणे भारतीय संघासाठी महागडे ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली. सायमन हार्मरने प्रत्येक डावात चार विकेट्स घेतल्या (एकूण आठ). केशव महाराजनेही तीन विकेट्स घेतल्या.
While we have been excellent in white- ball cricket.
We can’t call ourselves a top Test side with such planning.
Selections without clarity and over-tactical thinking are backfiring. Poor results over a year in tests barring a drawn series in England. . #IndvsSA — Venkatesh Prasad (@venkateshprasad) November 16, 2025
या दोन व्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाचे शानदार अर्धशतक आणि अक्षर पटेलचा महत्त्वाचा झेल यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजय मिळाला. 15 वर्षानंतर भारताच्या संघाला घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला विजय मिळण्यात यश मिळाले. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.