Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरूद्ध सामना जिंकूनही कर्णधार सुर्या खुश नाही! उघड केली भारतीय संघाची मोठी चूक…

झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात विजय मिळवला तरीही, कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी दिसत नव्हता. सामन्यानंतर, त्याने टीम इंडियाच्या एका मोठ्या चुकीकडे लक्ष वेधले आणि पुढील सामन्यात त्यावर काम करण्याचे आश्वासन दिले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 27, 2026 | 09:10 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Statement of Suryakumar Yadav after victory : २०२६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी शानदार विजय मिळवला. चेन्नईतील सामन्यात फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. प्रथम भारतीय संघाने २५६ धावा केल्या आणि त्यानंतर झिम्बाब्वेच्या खेळाडूंनीही धावांचा पाऊस पाडला. भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारताच्या संघाने सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताचा सुपर 8 चा शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणार आहे, हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे, जो संघ विजय मिळवेल त्या संघाला सेमीफायनलचे तिकीट मिळणार आहे. झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात विजय मिळवला तरीही, कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी दिसत नव्हता. सामन्यानंतर, त्याने टीम इंडियाच्या एका मोठ्या चुकीकडे लक्ष वेधले आणि पुढील सामन्यात त्यावर काम करण्याचे आश्वासन दिले.

T20 World Cup 2026 दरम्यान रिंकू सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर! उपचारादरम्यान झाले वडिलांचे निधन

विजयानंतरही कॅप्टन सूर्या आनंदी का नाही?

भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने सादरीकरण समारंभाला हजेरी लावली. त्याने फलंदाजीच्या क्रमाचे कौतुक केले, पण गोलंदाजीबद्दल तो असमाधानी होता. त्याला वाटले की भारतीय गोलंदाजांमध्ये काही खोलीची कमतरता आहे. तो म्हणाला, “वरच्या क्रमापासून ते क्रमांक ७ पर्यंत, आमच्या कामगिरीत फारशी कमतरता नव्हती. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही आमच्या गोलंदाजीमध्ये थोडे चांगले करू शकलो असतो. शेवटी, विजय महत्त्वाचा आहे आणि आता आम्ही आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.”

सूर्या पुढे म्हणाला, “वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी आम्ही सर्वकाही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. मी झिम्बाब्वेच्या फलंदाजांकडून श्रेय घेऊ इच्छित नाही. त्यांनी उत्तम फलंदाजी केली. गोलंदाजीच्या बाबतीत, महत्त्वाच्या क्षणी आम्ही थोडे अधिक हुशार असू शकलो असतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमचे निर्णय अधिक धाडसी असले पाहिजेत.”

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला दारुण पराभवाचा सामना करावा लागला, तर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला. वेस्ट इंडिज आणि भारत आता १-१ अशा बरोबरीत आहेत, दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही संघांमधील सामना १ मार्च रोजी होईल. विजयी संघ थेट २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल.

Web Title: Ind vs zim captain suryakumar yadav not happy despite winning the match against zimbabwe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Sports
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
1

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट
2

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.