
photo- social media
‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील चेपॉकची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींसाठी उपयुक्त ठरू शकते. रेकॉर्ड्स पाहिले असता, या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे आणि अफगाण संघात एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. परंतु, गेल्या काही सामन्यांमध्ये येथे मोठी धावसंख्या देखील उभारण्यात आली आहे. चेन्नईमध्ये सामान्यतः धावांचा पाठलाग करणे हा योग्य निर्णय मानला जातो, कारण संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे सोपे होते. परंतु, चेपॉकची खेळपट्टी कालांतराने संथ होऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
धर्मशाला येथे पावसामुळे बाधित झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर सात ७ विकेट्सने विजय मिळवला. पावसामुळे सामना २५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २४.५ षटकांत १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने २२.५ षटकांत तीन गडी गमावून १९५ धावा केल्या आणि सामना जिंकला. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना, शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ४९.५ षटकांत ४०२ धावा केल्या. गिलने १५४ आणि किशनने १२५ धावा केल्या. रोहितने ४८ धावा केल्या. अफगाणिस्तानला ४४.३ षटकांत केवळ २३२ धावाच करता आल्या. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता भारतीय संघ अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल.
भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, दरविश रसूली, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, अल्लाह गझनफर, फरीद अहमद, झिया-उर-रहमान.