
हँडशेक परंपरा पुन्हा मोडीत काढणार का? (फोटो सौजन्य - Instagram)
भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत सलमान अली आघा म्हणाला की, “आपण उद्या याबद्दल काय होतंय ते पाहू.” कोणत्याही परिस्थितीत “खेळाडूवृत्ती” राखली पाहिजे हे स्पष्ट केले. आघाने पुढे सांगितलं की, “क्रिकेट योग्य भावनेने खेळले पाहिजे. माझे वैयक्तिक मत कदाचित महत्त्वाचे नाही.” पण क्रिकेट नेहमीप्रमाणेच खेळले पाहिजे. पुढे काय करायचे ते त्यांनीच ठरवावे.’ तथापि, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या विधानाची अजूनही प्रतीक्षा आहे.
जय शाह स्टेडियममधून भारत-पाकिस्तान सामना पाहू शकतात
आयसीसी प्रमुख जय शाह रविवारी कोलंबोमध्ये असण्याची अपेक्षा आहे, जिथे ते भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या प्रतिनिधींसोबत अनौपचारिक बैठक घेऊ शकतात. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण वादावादीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले होते की ते भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आणि बीसीसीआयशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कोलंबोमध्ये असतील.
बांगलादेशी वृत्तपत्र प्रथम आलोशी बोलताना इस्लाम म्हणाले की या हाय-प्रोफाइल सामन्याचे निमंत्रण आयसीसीकडून आले आहे. ते म्हणाले, ‘आयसीसीने निर्णय घेतला आहे. हे पाच आशियाई देश आयसीसीचे प्रमुख भागधारक आहेत आणि १५ तारखेला होणाऱ्या भारत-पाकिस्तान विश्वचषक सामन्यासाठी, त्यांना या पाच आशियाई देशांचे प्रतिनिधी मैदानावर एकत्र उपस्थित राहावेत, एकत्र सामना पहावा आणि एकमेकांशी संवाद साधावा अशी त्यांची इच्छा आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रम
भारताने पाकिस्तानविरुद्ध १६ वेळा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी १२ वेळा टीम इंडिया जिंकली आहे आणि फक्त तीन वेळा हरली आहे. दुसरा सामना २००७ चा ऐतिहासिक ‘बॉल-आउट’ होता, जो टाय झाला होता. आता यावर्षी सर्वांचे लक्ष भारत – पाकिस्तानच्या सामन्यावर आहे. मात्र कोलंबोत पाऊस सुरू झाल्याने सध्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. पाऊस पडू नये अशीच प्रार्थना सध्या चाहते करत आहेत. भारत आणि पाकिस्तान हा सामना म्हणजे क्रिकेटसाठी पर्वणीच असते. त्यामुळे हा सामना सर्वांना पाहता यावा अशीच सर्वांची अपेक्षा आहे.
IND Vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची एंट्री, रविवारी रद्द होणार स्फोटक मॅच?