
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
थायलंड येथे सुरू असलेल्या ट्रेंडथाई क्रिकेट मैदानावर आशिया कप रायझिंग स्टार्स वुमन्स 2026 चा फायनलचा सामना आज खेळवण्यात आला. हा फायनलचा सामना भारत महिला अ संघ विरुद्ध बांगलादेश महिला अ संघ यांच्यामध्ये पार पडला. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 134 धावा केल्या होत्या. भारतीय फलंदाजी सुरुवातीला खराब झाली भारताची फलंदाज तेजल हसबणीस अर्धशतक ठोकून भारताच्या संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचे योगदान दिले. भारतीय अ संघाने अंतिम सामन्यात बांगलादेश अ संघाला ४६ धावांनी पराभूत करून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आशिया कप रायझिंग स्टारचे हे सामने कमी धावसंख्या असलेले सामने पाहायला मिळाले. आशिया कप रायझिंग स्टार मेन्स 2026 फायनलच्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर भारतीय कर्णधार राधा यादव हिने 30 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. तेजलने फक्त ३३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ५१ धावा केल्या. तिने कर्णधार राधा यादवसोबत ४९ चेंडूत पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. राधाने ३० चेंडूत ३६ धावा केल्या.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆 The Radha Yadav-led India A team clinch the #WomensRisingStarsAsiaCup title 🇮🇳 🙌 Scorecard ▶️ https://t.co/BazaDT9PQD pic.twitter.com/aCKmZ8w5aO — BCCI Women (@BCCIWomen) February 22, 2026
सलामीवीर नंदिनी कश्यपने १५ चेंडूत ८ धावा केल्या, तर वृंदा दिनेशने १७ चेंडूत १९ धावा केल्या. अनुष्का शर्मानेही १२ चेंडूत ८ धावा केल्या. बांगलादेशकडून फहिमा खातूनने शानदार गोलंदाजी केली, तिने चार षटकांत २५ धावा देत चार बळी घेतले. फरजाना इस्मिन आणि फातिमा जहाँ सोनिया यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
बांगलादेशचा संघ २० षटकांत ८८ धावांतच गारद झाला. संघाच्या एकाही फलंदाजाने विशेष कामगिरी केली नाही. सलामीवीर इश्मा तन्झिमने ३ धावा केल्या, तर कर्णधार शमीमा सुलतानाने १६ चेंडूत २० धावा केल्या. सरमीन सुलतानानेही २९ चेंडूत १८ धावा केल्या. भारताकडून प्रेमा रावतने ३ बळी घेतले, तर तनुज कंवर आणि सोनिया मेंधिया यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. बांगलादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत, ज्यामुळे भारताला अंतिम सामन्यात सहज विजय मिळाला.