
श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय संघाला आणि श्रेयस अय्यरला एकही सामना जिंकता आलेला नाही. इतिहासात प्रथमच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लंडने देखील दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला आहे.
आज भारत अन् इंग्लंडमध्ये तिसरा टी 20 सामना होणार आहे. श्रेयस अय्यरसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. श्रेयस अय्यरने आजचा सामना देखील गमावला तर त्याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. आतापर्यंत सलग 5 सामने खेळून एकही सामना भारत जिंकला नाही असे झालेले नाही.
क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?
2021 मध्ये भारतीय संघाने असा रेकॉर्ड नोंदवला होता. आयसीसी वर्ल्डकप 2021 च्या आधी भारतीय संघ भारताने श्रीलंकेविरुद्ध दोन सामने गमावले होते. त्यानंतर भारताला पाकिस्तान व न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे भारतीय संघाने सलग चार सामने गमावले होते. आता देखील तशीच स्थिती निर्माण झाली आहे. चार सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. आजचा सामना देखील भारताने गमावला तर श्रेयस अय्यरच्या नावावर सलग 5 सामने न जिंकण्याचा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.
वैभव सूर्यवंशीला मैदानातच सराव करताना दुखापत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यापूर्वी, भारतीय संघातून एक अशी बातमी आली, ज्यामुळे क्षणभर सर्वांचा श्वासच थांबला. भारतीय क्रिकेटचा नवा ‘वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी, नेट प्रॅक्टिसदरम्यान एका गंभीर दुखापतीतून थोडक्यात बचावला. इंग्लंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांसाठी तयारी करत असलेल्या वैभवला, फलंदाजीच्या सरावादरम्यान एक वेगवान चेंडू थेट शरीरावर लागला, ज्यामुळे तो वेदनेने विव्हळत मैदानावरच बसून राहिला. मात्र, या तरुण खेळाडूने दाखवलेल्या जिद्दीने ट्रेंट ब्रिज मैदानावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रभावित केले.