
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी, सूर्यकुमार यादवने याबाबत अपडेट दिली आहे. सूर्या म्हणाला की पांड्याची प्रकृती ठीक नाही आणि त्याला पूर्णपणे बरे वाटत नव्हतं. तो सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फीट नव्हता. हार्दिक पांड्याची गैरहजेरी मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचं कारण ठरत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याची प्रकृती फारशी गंभीर नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिकला विश्रांती देण्यात आली होती; कारण ही स्पर्धा अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सुरुवातीच्या काळातच आपल्या कर्णधारासाठी आणि स्टार ऑलराऊंडरच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करायचा नव्हता. 7 एप्रिल रोजी गुवाहाटीमध्ये होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक मैदानात दिसणार अशी अपेक्षा केली जात आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून, त्यात त्यांना एक विजयाला आणि दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. आपल्या पहिल्या सामन्यात, मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २२१ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले होतं. मात्र, दुसऱ्या सामन्यात मुंबईला दिल्ली कॅपिटल्सकडून ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला. गुणतालिकेवर, मुंबई सध्या २ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
मुंबईचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. रियान परागच्या नेतृत्वाखाली, राजस्थानचा संघ उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि त्यांनी आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानने यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना ७ एप्रिल रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे.