हार्दिक पांड्या-रोहित शर्मा : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यामध्ये काल महायुद्ध पाहायला मिळालं. या सामन्यामध्ये मैदानावरील खेळाडूंच्या त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांच्या भावना सुद्धा बाहेर आल्या. भारत पाकिस्तान सामना म्हंटल्यावर तो सामना जिंकणे किती महत्वाचे आहे. भारताचा संघ सध्या विश्वचषकामध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळत आहे. तर भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आहे. यंदाच्या आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) बरेच काही घडले. त्यामुळे संघाच्या निकालावरही परिणाम झाला. यंदा मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) फ्रँचायझीने असे काही केले ज्या मुंबई इंडियन्सचे चाहते आयपीएल 2024 मध्ये नाराज दिसले. याचे कारण म्हणजेच हार्दिक पांड्याचे कर्णधारपद.
[read_also content=”T20 विश्वचषक 2024 च्या ग्रुप A मधील गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानावर https://www.navarashtra.com/sports/team-india-topped-the-t20-world-cup-2024-group-a-points-table-545536.html”]
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामधील वाद!
काही दिवसांपूर्वीच्या इतिहासात गेलो तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये वाद दिसून आले. या वादांची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने रोहित शर्माचे कर्णधार पद काढून घेतले आणि हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यामुळे चाहत्यांनी हार्दिकला संपूर्ण आयपीएल 2024 च्या सीझनमध्ये ट्रोल केले. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी अनेकदा मैदानामध्ये मागणीही केली होती की त्यांना पुन्हा रोहित शर्मा कर्णधार म्हणून पाहायचा आहे परंतु असे झाले नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स यंदाच्या सीझनमध्ये खराब कामगिरी केली आणि संघ टॉप 4 मधेही पोहोचू शकला नाही त्यामुळे पांड्याला टीकेला सामोरे जावे लागले.
हार्दिक-रोहितमधील वाद मिटले?
काल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाच्या विजयाच्या आशा काही काळासाठी संपुष्टात आल्या होत्या. परंतु यादरम्यान भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने अविस्मरणीय कामगिरी करून भारताच्या संघाला विजय मिळवून दिला. कालच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूंवर शादाब खानचा विकेट्स घेतल्यावर कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याला उचलून घेतले. त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. हा क्षण पाहून नक्कीच क्रिकेट चाहत्यांचे मन भरून आले असेल. कारण आयपीएलमध्ये झालेल्या हा घटनांमुळे नक्कीच चाहते नाराज होते. हा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.






