जसप्रीत बूमराह (फोटो- सोशल मिडिया)
आजपासून आयपीएलच्या महासोहळ्याला सुरुवात
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी
जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी झाला सज्ज
Tata IPL MI vs KKR 2026: आजपासून आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना होणार आहे. तर उद्याचा रविवार देखील विशेष असणार आहे. कारण 5 वेळा आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान सामना होण्याआधी मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळू शकणार की नाही अशी चिंता मुंबईच्या संघाला आणि चाहत्यांना भेडसावत आहे. उद्या मुंबईचा संघ कोलकताविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह उद्याचा सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे.
उद्या मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र सामना होण्याआधी काही दिवस जसप्रीत बुमराह संघासोबत जोडला गेला नव्हता. त्यामुळे चिंता वाढली होती. बुमराह अचानक बेंगलोरच्या फिटनेस सेंटरमध्ये दाखल झाला होता. तो दुखापतग्रस्त असल्याचे समोर आले होते. मात्र आता बुमराह संघाशी जोडला गेला आहे. तो मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे.
IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली
वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व असणार?
आयपीएल 2026 ची नव्या सिझनची आज सुरूवात होणार आहे. यासाठी आता बीसीसीआयने जोरदार तयारी केली आहे. आज या स्पर्धेचा पहिला सामना आरसीबी आणि एसआरएच यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना हा रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघामध्ये रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हे हार्दिक पांड्या करताना दिसणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सची कमान अजिंक्य रहाणे सांभाळताना दिसणार आहे.
पाच वेळचे विजेते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा दुसरा सामना रविवारी होणार आहे. दोन्ही संघांसाठी या हंगामातील हा पहिलाच सामना असेल, जो वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या ऐतिहासिक स्टेडियमची खेळपट्टी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मुंबईने २०२० पासून आयपीएल जिंकलेली नाही आणि या हंगामात आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.






