माजी रणजी क्रिकेटपटू अनंत धामणे यांचे निधन
अनंत धामणे यांनी १९५९-६० ते १९६३-६४ या कालावधीत (Sports) महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १० प्रथम श्रेणी सामने खेळले. उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज आणि प्रभावी मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी क्रिकेट वर्तुळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मुंबई, गुजरात आणि सौराष्ट्र यांसारख्या बलाढ्य आणि दिग्गज संघांविरुद्ध त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.
पाण्याचा प्रवाह देखील झुकला! अवघ्या १३व्या वर्षी ८१ किलोमीटरचा जलप्रवास; विदी भोरने 11 तास अन्…
व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी प्रतिष्ठित ‘मोईन-उद-दौला ट्रॉफी’मध्ये सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे क्रिकेटप्रेम कमी झाले नाही आणि ते खेळाशी सातत्याने जोडलेले राहिले. प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणून योगदान खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर धामणे यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली:
निवड समिती: महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील (Under-15) आणि १९ वर्षांखालील (Under-19) संघांच्या निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक नवोदित खेळाडूंना शोधण्याचे काम केले.
रणजी प्रशिक्षक: महाराष्ट्र रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, अनुभवी आणि क्रिकेटला समर्पित असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे.






