नसीम शाह : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये काल सामना रंगला होता. कालचा सामना भारताच्या संघाने 6 धावांनी जिंकला. कालच्या सामान्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी कालच्या सामन्यामध्ये खराब कामगिरी केली. तर पाकिस्तानच्या संघाने टीम इंडिया 19 षटकात 119 धावांवर ऑलआऊट केले. भारताच्या संघामध्ये फक्त रिषभ पंतने सर्वाधिक 31 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. पाकिस्तानसाठी नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत होते, पण बुमराह आणि हार्दिक पांड्याने सामना हिरावून घेतला. (फोटो सौजन्य – ICC X अकाउंट)
[read_also content=”सचिनपासून सेहवागपर्यंत, भारताच्या विजयावर दिग्गजांनी सोशल मीडियावर केला आनंद व्यक्त https://www.navarashtra.com/sports/from-sachin-to-sehwag-legends-took-to-social-media-to-celebrate-india-victory-545565.html”]
टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतर वेगवान गोलंदाज नसीम शाह मैदानावरच रडू लागला. त्याचवेळी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सहभागी झालेले प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी फलंदाजांची जोरदार खरडपट्टी काढली. रोमहर्षक सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह मैदानावरच अनियंत्रितपणे रडू लागला. शाहीन आफ्रिदी त्याला समजावताना दिसला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फलंदाजी करताना नसीम शाहने 4 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या. अखेरच्या षटकात त्याने अर्शदीपवर दोन चौकार मारले, तरीही तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
काय म्हणाले गॅरी कर्स्टन?
भारताच्या संघाला पाकिस्तानने 119 धावांवर रोखले. तरीही भारताच्या संघाने विजय मिळवला आणि पाकिस्तानच्या संघाला 113 धावांवर रोखले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर ताशेरे ओढले. हा पराभव निराशाजनक असल्याचे ते म्हणाले. 120 च्या धावसंख्येचा पाठलाग होणार आहे हे सर्वांना माहीत होते. ते पुढे म्हणाले की आम्ही सामन्यादरम्यान चुकीचे निर्णय घेतले. फलंदाजांनी झटपट विकेट गमावल्या. कर्स्टन म्हणाले की, रिजवान वगळता इतर सर्व फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही.






