
असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही...
भारतीय संघात रजत पाटीदारची मिळाले नाही स्थान
आरसीबीने पाटीदारच्या नेतृत्वर जिंकले दोनदा विजेतेपद
भारतीय संघ इंग्लंड व आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार
BCCI /Team India: बीसीसीआयने नुकतीच इंग्लंड आणि आयर्लंड संघासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची या संघात निवड करण्यात आली आहे. तर भारतीय टी – 20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र सलग दोन वेळेस कर्णधार म्हणून आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या रजत पाटीदारला स्थान देण्यात आले नाही. आता रजत पाटीदारने प्रत्युत्तर दिले आहे.
निवड समितीने राजत पाटीदारला भारतीय संघात स्थान दिले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रजत पाटीदारने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मध्यप्रदेश प्रीमियर लीगमध्ये ग्वाल्हेर चित्ताकडून खेळताना रजत पाटीदारने शानदार फलंदाजी केली. त्याने 30 बॉलमध्ये शानदार 65 रन्सची खेळी केली. आपली खेळादरम्यान राजत पाटीदारने 6 चौके आणि 4 सिक्सर लगावले.
ग्वाल्हेर चित्ता संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. या संघाने 41 रन्सवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी रजत पाटीदारने संघाचा डाव सांभाळला. त्याने अन्य फलंदाजांसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या. तसेच त्याच्या 65 रन्सच्या खेळीच्या जोरावर ग्वाल्हेर चित्ता संघाने 190 रन्स पर्यन्त मजल मारली. मालवा स्टैलियन्सच्या संघाला 190 रन्सचा पाठलाग करणे शक्य झाले नाही.
‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. रजत पाटीदारने आयपीएल 2026 मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तरी देखील बीसीसीआयने इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाल रजत पाटीदारला स्थान दिलेले नाही. त्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार
भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.
भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव