
भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र मॅनेजमेंटने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनवर विश्वास दर्शवला. मात्र आयर्लंडविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसन अपयशी ठरला आहे. तीनही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला खेळवले गेले नाही. त्यामुळे आटा रवी शास्त्री यांनी मॅनेजमेंटला सल्ला दिला आहे.
काय म्हणाले रवी शास्त्री?
वैभव सूर्यवंशीला आयर्लंडविरुद्ध खेळवायला हवे होते. तिथले स्टेडियम लहान होते. पीच स्लो होते, तर त्याने चांगली खेळी केली असती. आता इंग्लंडविरुद्ध पण संधी मिळेल की माहिती नाही, मात्र लवकरात लवकर त्याला खेळवले पाहिजे. आयपीएलमध्ये त्याने सर्व वेगवान गोलंदाजांची धुलाई केली आहे आणि तुम्ही त्याला अजून बेंचवर बसवले आहे.
"Arrey, woh khelna chahiye tha yaar!" 👀 Ravi Shastri's brutally honest take on Vaibhav Sooryavanshi 💬 Watch #ENGvIND, 2nd T20I on 4th July, 6 PM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels.#SonySportsNetwork #MamlaPersonalHai #ExtraaaInnings pic.twitter.com/0S9yMguEig — Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 1, 2026
भारत इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मात्र या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले नव्हते. आयर्लंडविरुद्ध देखील त्याला संधी देण्यात आली नाही. त्यावरून सोशल मिडियावरून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक दीगगाक क्रिकेटपटू यांनी देखील त्याला खेळवायला हवे होते असे मत व्यक्त केले होते.
पावसामुळे पहिला T-20 सामना रद्द
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू झाली. पहिला सामना बुधवारी रात्री (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळला गेला. मात्र, पावसामुळे सामन्याचा निकाल लागू शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. भारताचा नवीन टी-20 कर्णधार श्रेयस अय्यरसाठी आयर्लंड दौरा ही एक विशेष आठवण आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील त्याच्या अर्धशतकाने हे सिद्ध केले की तो कोणापेक्षाही कमी नाही. भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.