
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने गेल्या वर्षी ७ मे रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याने एका मुलाखतीत म्हटले की, ‘ज्या दिवशी मला वाटेल की मी मैदानावर मला जे करायचे आहे ते करू शकत नाही, त्या दिवशी मी खेळणे थांबवेन. पण सध्या, माझा विश्वास आहे की मी जे काही करत आहे त्याचा संघाला फायदा होत आहे.’ रोहितने त्याच्या निवृत्तीवर केलेले हे वक्तव्य पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहितने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११ धावा केल्या तर दुसऱ्या सामन्यात २६ धावा केल्या. यानंतर लॉर्ड्सवरील तिसरा सामना हा रोहितचा शेवटचा सामना असेल अशी चर्चा सुरु झाली. परंतु रोहित किंवा बीसीसीआयने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा पसरण्याची ही पहिली वेळ नाही. त्याच्या कर्णधारपदाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली होती आणि त्यानंतरही रोहितच्या निवृत्तीबद्दल विविध दावे समोर आले होते.
एका वृत्तानुसार, निवड समितीने रोहित शर्माला संघ व्यवस्थापनाने कळवले आहे की, २०२७ च्या विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश केला जाणार नाही. अलीकडेच अनेक माध्यमांनी असा दावा केला आहे की, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून भारतीय निवड समितीला तरुण खेळाडूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे. परिणामी, रोहित शर्माच्या भविष्याबद्दल प्रश्न निर्माण झाले. असे वृत्त आहे की, निवड समिती पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी यशस्वी जैस्वालला संधी देऊ इच्छिते. परंतु, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, रोहित शर्माने आधीच जाहीर केले आहे की, २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतासाठी खेळणे हे त्याचे ध्येय आहे.
PV Sindhu ची विजयी गर्जना; चेन यूफेईला नमवत Japan Open 2026 च्या फायनलमध्ये धडक