
अहमदाबादमध्ये फायनलचा रणसंग्राम! नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने (Photo Credit- X)
टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.
न्यूझीलंड: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर (कर्णधार), जेकब डफी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन.
IT’S FINAL TIME! 🏆 Mitchell Santner wins the toss and New Zealand are bowling first 🔗 https://t.co/f2VF5XOfMx pic.twitter.com/eJHwUhy1EV — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 8, 2026
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड चौथ्यांदा आमनेसामने येत आहेत. एक रंजक आणि भारतासाठी काहीशी चिंतेची बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या तिन्ही विश्वचषक लढतींमध्ये न्यूझीलंडनेच बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात केवळ विजेतेपदच नव्हे, तर ‘किवी’ संघाविरुद्धचा हा खराब रेकॉर्ड पुसून काढण्याचे मोठे आव्हान सूर्या सेनेसमोर असेल. तसेच दोन्ही संघामध्ये एकूण ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारताने १८ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आहे.
सध्याचा फॉर्म, संघाचे संतुलन आणि घरच्या मैदानावर मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा पाहता, तज्ज्ञांच्या मते भारताचे पारडे जड आहे.