
मागील वर्षी 2025 मध्ये शुभमन गिलची नियुक्ती भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. त्याच्या नेतरुतवार भारताने आतापर्यंत 4 वनडे सिरिज खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगणिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. 37 वर्षांमध्ये जे झाले नाही ते भारतीय संघाचे शुभमन गिल कर्णधार झाल्यावर झाले आहे.
गेल्या 9 महिन्यांमध्ये गिलच्या नेतृत्वात भारत 4 वनडे सिरिज खेळला आहे. ज्यामध्ये केवळ एकाच सिरिजमध्ये भारतीय संघाचा विजय झाला आहे. अफगणिस्तानच्या संघाने भारताला भारतातच पराभूत केले आहे. बाकी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघाने देखील भारतीय संघाला हरवले आहे.
इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात
शुभमन गिल कर्णधार झाल्यावर पहिली वनडे सिरिज ओसत्रलियाविरुद्ध खेळला होता. ऑक्टोबर 2025 मध्ये या सिरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 2-1 असे पराभूत केले होते. त्यानंतर भारतीय संघ मायभूमीत न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाला. 1988 पासून मायदेशात भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला नव्हता. मात्र शुभमनच्या नेतृत्वात तो रेकॉर्ड मोडला गेला. त्यानंतर भारतीय संघ अफगणिस्तानविरुद्ध जिंकला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये भारताचा पराभव झाला आहे.
एक फलंदाज म्हणून शुभमन गिलची वैयक्तिक कामगिरी चांगली असल्याचे दिसून येत आहे. कर्णधार म्हणून संघाला विजय मिळवून देण्यात तो काहीसा कमी पडताना दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काळात शुभमन गिलची देखील कर्णधार म्हणून उचलबांगडी होणार का हे पहावे लागणार आहे.
मोठे मोठे पराभव पत्करले गंमतमध्ये! Team India त गंभीरचे ‘गेम प्लॅनिंग’ फ्लॉप; इंग्लंडने पाजले पाणी
लॉर्डसच्या मैदानावर भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा वनडे सामना खेळवला गेला. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. त्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. शुभमन गिलचे 77, रोहित शर्माचे 138 रन्सची शानदार शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या 74 रन्सच्या जोरावर भारताने ही टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र 27 रन्सने भारताचा पराभव झाला