
भारताने अफगणिस्तानविरुद्ध जिंकला कसोटी सामना
अफगणिस्तानविरुद्ध भारताचा 1 डाव अन् 300 रन्सने पराभव
फॉलोऑनमध्ये अफगणिस्तानचा डाव 112 वर ऑल आउट
India Beat Afghanistan Test Match: न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अफगणिस्तानमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात आला. 6 जूनपासून हा कसोटी सामना सुरू झाला होता. अखेर या सामन्यात भारताने अफगणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने मोठा विजय प्राप्त केला आहे. मात्र या सामन्यात भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला होता. फॉलोऑनचा नियम नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना पार पडला. टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात चर्चा सुरू आहे ती फॉलोऑनची. फॉलोऑनचा नियम काय सांगतो? फॉलोऑन म्हणजे नक्की काय? याबाबत जाणून घेऊयात.
काय सांगतो फॉलोऑनचा नियम?
पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने प्रचंड धावसंख्या केली आणि त्यानंतर फलंदाजी करणारा संघ 200 किंवा त्यापेक्षा कमी रन्सवर ऑल आउट झाला. तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार दुसऱ्या संघाला फॉलोऑन देऊ शकतो. मुल्लानपूर येथे झालेल्या कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. पहिल्या डावात अफगाणिस्तान 152 रन्सवर ऑल आउट झाला. तर दुसऱ्या डावात म्हणजे फॉलोऑन मिळाल्यावर 112 रन्सवर अफगाणिस्तान संघ ऑल आउट झाला. हा सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे.
IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ
न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगणिस्तान या एकमेव कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. भारताने अफगणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. मानव सुथारने देखील पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेत एक नवा रेकॉर्ड रचला.
Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे
भारताने प्रथम फलंदाजी करताना 564 वर 8 विकेट्स गमावत अपला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. भारतीय संघाने अफगणिस्तानच्या संघाला फॉलोऑन दिला. मात्र त्या ठिकाणी अफगणिस्तानचा संघ 112 रन्सवर ऑल आउट झाला. यामुळे भारताने हा एकमेव कसोटी सामना 1 डाव आणि 300 रन्सने जिंकला आहे. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अफगणिस्तानवर अंकुश ठेवला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव अव मानव सुथार या फिरकी गोलंदाजांनी शानदार मारा केला आहे. पहिल्या डावात मानव सुथारने 6 तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली.