
मोबाईलवर येणार आपत्ती अलर्ट! मेसेज पाहून घाबरू नका... सरकार करतंय नव्या सिस्टिमची चाचणी
Moto ने उडवली सर्वांची झोप! 200MP कॅमेऱ्यासह तगडा स्मार्टफोन लाँच, फीचर्सवर एकदा नजर टाका
दूरसंचार विभागाद्वारे ही चाचणी केली जात आहे. या चाचणीमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देखील सहभाग घेतला आहे. दोघेही एकत्र येऊन देशात मोबाईलद्वारे आपत्ती संबंधित माहिती देण्याची प्रणाली आणखी मबजूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सरकारचे असे उद्दिष्ट आहे की, कोणत्याही आपत्तीजन्य किंवा अपात्कालीन परिस्थितीत लोकांना वेळीच सूचना दिली जावी, ज्यामुळे नुकसान होऊ नये आणि लोकांची सुरक्षा वाढावी. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही अलर्ट सिस्टिम ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) वर आधारित असणार आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने सुचवले आहे ही सिस्टिम सर्व 36 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आधीपासूनच सक्रीय आहे. या सिस्टिमच्या मदतीने एखाद्या विशेष भागातील मोबाईल यूजर्सना एसएमएसद्वारे आपत्तीसंंबंधित सूचना पाठवल्या जातात. याचा फायदा असा आहे की, ज्या ठिकाणी धोका असेल अशा भागातील लोकांना अलर्ट पाठवला जातो.
एसएमएसव्यतिरिक्त आता सेल ब्रॉडकास्ट टेक्नोलॉजीचा देखील वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एखाद्या विशेष भागातील सर्व मोबाईल डिव्हाईसवर एकाचवेळी मेसेज पाठवला जातो. यामुळे सर्व लोकांना रियल-टाइममध्ये अलर्ट मिळतो. ही सिस्टिम मोठ्या भागात एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत अलर्ट पोहोचवण्यासाठी प्रभावी मानली जाते. अशी माहिती मिळाली आहे की, ही संपूर्ण सिस्टिम टेलिमॅटिक्स विकास केंद्राने डिझाईन आणि डेव्हलप केली आहे. ही सिस्टिम ‘मेक इन इंडिया’ चे अतिशय उत्तम उदाहरण मानले जात आहे, ज्यामध्ये देशातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. ही सिस्टिम लाँच करण्यापूर्वी सरकारने त्याची विश्वसनीयता आणि परफॉर्मंसची चाचणी केली आहे.
चाचणीदरम्यान तुमच्या फोनवर इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित भागातील भाषेत एसएमएस पाठवले जाऊ शकतात. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की, या मेसेजकडे दुर्लक्ष करा आणि घाबरू नका. ही केवळ एक चाचणी सुरु आहे.