
देशात इंटरनेट युजर्सची संख्या ९५ कोटींपेक्षा जास्त, शहरांपेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक वापर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जोमात
देशात इंटरनेट युजर्सची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या वर्षी, भारतातील इंटरनेट युजर्सची संख्या ८% ने वाढून ९५ कोटी ५० लाख झाली. इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि Kantar यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की इंटरनेट युजर्समध्ये ही वाढ ग्रामीण भागात इंटरनेटची उपलब्धता, लघु व्हिडिओंची वाढती लोकप्रियता आणि AI ची लोकप्रियता यामुळे झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की, शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट वापरकर्ते वेगाने वाढत आहेत. गेल्या वर्षी शहरी भागात इंटरनेट युजर्सची संख्या फक्त ३ टक्क्यांनी वाढली. दरम्यान, ग्रामीण भागात इंटरनेट युजर्सची संख्या १२ टक्क्यांनी वाढली आहे. ग्रामीण भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या सहा वर्षांत दुप्पट झाली आहे. २०१९ मध्ये इंटरनेट युजर्सची संख्या २६४ दशलक्ष होती. २०२५ मध्ये ही संख्या ५४८ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे.
IAMAI आणि Kantar ने त्यांच्या अहवालात असा अंदाज लावला आहे की या वर्षी (२०२६) देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १ अब्ज ओलांडेल. २०१९ मध्ये, देशात इंटरनेट वापरकर्त्यांची एकूण संख्या ५७४ दशलक्ष होती. २०२५ पर्यंत ही संख्या ९५५ दशलक्ष होण्याचा अंदाज आहे.
४४ टक्के इंटरनेट वापरकर्ते व्हॉइस-इमेज सर्च सारख्या एआय-सक्षम वैशिष्ट्यांचा वापर करतात.
६६ टक्के वापरकर्ते लघु व्हिडिओ सामग्री पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. ग्रामीण भारतात सर्वाधिक वापरकर्ते आहेत.
शहरी भागात, ५६ टक्के लोक ऑनलाइन शॉपिंगसाठी इंटरनेट वापरतात.
२० टक्के इंटरनेट वापरकर्ते फोन आणि लॅपटॉप सारख्या उपकरणांमधून इंटरनेट वापरतात.