
आजपासून नवा डिजिटल नियम लागू! सिम कार्डशिवाय नाही चालणार WhatsApp-Telegram, डेस्कटॉप लॉगिनवरही परिणाम
सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश असा आहे की, सायबर फ्रॉड थांबवणे, डिजीटल धोक्यांपासून यूजर्सचे संरक्षण करणं. लक्षात ठेवा की, सिम इनअॅक्टिव्ह किंवा बंद असेल तर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. आजपासून व्हॉट्सअॅप, टेलिग्राम अकाऊंट तेव्हाच काम करणार आहेत, ज्यावेळेस तुमच्या फोनमध्ये सिम कार्ड असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमकार्ड अॅक्टिव्ह असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुमचे व्हॉट्सअॅप, टेलिग्राम अकाऊंट बंद होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
दूरसंचार मंत्रालयने 28 नोव्हेंबरला सिम बाइंडिग नियमांची घोषणा केली होती. त्यानंतर दूरसंचार मंत्रालयने सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म कंपन्यांना 90 दिवसांचा वेळ दिला होता. हा कार्यकाळ 28 फेब्रुवारी रोजी समाप्त झाला आहे. आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपने याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा केली नाही. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला, व्हॉट्सअॅपने घोषणा केली की त्यांनी भारतातील सिम बंधन नियमांची चाचणी सुरू केली आहे.
वेब आणि डेस्कटॉप लॉगिनवर, तुमचे खाते दर 6 तासांनी लॉग आउट होईल आणि QR कोड वापरून पुन्हा लॉग इन करावे लागेल.
सरकार प्रयत्न करत आहे की, या नवीन नियमांमुळे सायबर फ्रॉड रोखण्यासाठी मदत होऊ शकते. हे पाऊल सामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. मात्र आपलं अकाऊंट बंद होऊ नये यासाठी यूजर्सना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. जर फोनमध्ये सिम सक्रिय नसेल तर तुमच्या फोनवर व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम काम करणार नाहीत. सिम काढून दुसऱ्या फोनमध्ये घातल्यास व्हॉट्सअॅप काम करणे थांबवेल. जर तुम्ही सिम काढून टाकला तर व्हॉट्सअॅप तात्पुरते निष्क्रिय होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या हँडसेटमध्ये पुन्हा सिम घालावा लागेल आणि लॉगिन प्रक्रिया सुरू करावी लागेल.