पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर्स सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर धावत आहेत.
अनेक वर्षांपासून वापरात असलेली ७०० मिमीची जुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाईन बदलून आता ९०० मिमीची नवीन मोठी पाईपलाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा भाग राज्याच्या दोन बड्या राजकीय नेत्यांचा बालेकिल्ला मानला जातो. इटाण हे गाव काँग्रेसचे नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव आहे.
मराठवाड्यातल्या या मोठ्या धरणांचा प्रकल्पिय संकल्पित साठा ५१५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. यामध्ये सध्या ४१८३ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हासाठा ४२९० दशलक्ष घनमीटर एवढा होता.