मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. मुंबईत करोडो मराठा बांधवांना एकत्र करून हैदराबाद गॅजेटचा जीआर आणल्यानंतर आणि गुलाल उधळल्यानंतर आता पुन्हा उपोषणाची गरज काय? जरांगे यांना स्वतःचा फायदा करून घेता आला नाही आणि त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण न झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. तसेच जरांगे यांच्यामुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेल्याने युवकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमधील पोलीस भरतीचे उदाहरण देत ते म्हणाले की अधिक गुण असूनही कुणबी युवकांना नोकरी मिळाली नाही, तर कमी गुणांच्या मुस्लिम EWS धारकांना ती मिळाली. यामुळे मनोज जरांगे हे ‘मराठा योद्धा’ नसून ‘मुस्लिम योद्धा’ आहेत अशी टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. मुंबईत करोडो मराठा बांधवांना एकत्र करून हैदराबाद गॅजेटचा जीआर आणल्यानंतर आणि गुलाल उधळल्यानंतर आता पुन्हा उपोषणाची गरज काय? जरांगे यांना स्वतःचा फायदा करून घेता आला नाही आणि त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण न झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. तसेच जरांगे यांच्यामुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेल्याने युवकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमधील पोलीस भरतीचे उदाहरण देत ते म्हणाले की अधिक गुण असूनही कुणबी युवकांना नोकरी मिळाली नाही, तर कमी गुणांच्या मुस्लिम EWS धारकांना ती मिळाली. यामुळे मनोज जरांगे हे ‘मराठा योद्धा’ नसून ‘मुस्लिम योद्धा’ आहेत अशी टीका त्यांनी केली.