बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, हे छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने स्थापित केलेला पुतळा हटवण्यासाठी दोन गटात वाद झाला ज्यामध्ये माणुसकीला लाजवणारी घटना घडली, महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला, पडसादही उमटले.. याप्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत 37 जणांवर गुन्हा दाखल करून 21 जणांना अटक केली आहे.. सध्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला, हे छत्रपती शिवरायांचे आजोळ आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने स्थापित केलेला पुतळा हटवण्यासाठी दोन गटात वाद झाला ज्यामध्ये माणुसकीला लाजवणारी घटना घडली, महिलेला अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला, पडसादही उमटले.. याप्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत 37 जणांवर गुन्हा दाखल करून 21 जणांना अटक केली आहे.. सध्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे.






