कल्याणमध्ये आयोजित बुद्धिस्ट वधू-वर परिचय मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांनी सध्याच्या राजकारणावर आणि पक्षांतर्गत तिकिट वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढीसाठी तसेच कोणतेही सामाजिक कार्य न केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “आजच्या राजकारणात चोर आणि शायनर घुसले आहेत,” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली. अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली जाते, असेही त्या म्हणाल्या.
कल्याणमध्ये आयोजित बुद्धिस्ट वधू-वर परिचय मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे यांनी सध्याच्या राजकारणावर आणि पक्षांतर्गत तिकिट वाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली. केडीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढीसाठी तसेच कोणतेही सामाजिक कार्य न केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “आजच्या राजकारणात चोर आणि शायनर घुसले आहेत,” असे वादग्रस्त विधान करत त्यांनी तळागाळात काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली. अशा उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकली जाते, असेही त्या म्हणाल्या.