नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन नाका येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील गजबजलेल्या चौकात बसवलेला सिग्नल सध्या बंद अवस्थेत असून तो केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सिग्नल कार्यरत नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. स्टेशनकडे जाण्यासाठी अवघे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रिक्षाने किमान अर्धा तास लागत असल्याचे नागरिक सांगतात, तर पायी प्रवास करणाऱ्यांनाही मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. शाळकरी मुले, कामगार, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.
नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन नाका येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील गजबजलेल्या चौकात बसवलेला सिग्नल सध्या बंद अवस्थेत असून तो केवळ ‘शोपीस’ ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सिग्नल कार्यरत नसल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत आहे. स्टेशनकडे जाण्यासाठी अवघे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी रिक्षाने किमान अर्धा तास लागत असल्याचे नागरिक सांगतात, तर पायी प्रवास करणाऱ्यांनाही मोठा वेळ खर्च करावा लागत आहे. शाळकरी मुले, कामगार, नोकरदार वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा मोठा फटका बसत आहे.






