पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी तब्बल १७ दिवस केलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत आज बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारने दोन शासन निर्णय पूर्ण केल्याचं सांगत, इतर मागण्याही मान्य केल्याचा दावा केला आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व विभागांशी चर्चा करून रिक्त पदांचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर नोकरभरती सुरू करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. आश्रमशाळांमधील भोजनाचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध अडचणींवरही लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी तब्बल १७ दिवस केलेल्या आंदोलनात आता फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रतिनिधींसोबत आज बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सरकारने दोन शासन निर्णय पूर्ण केल्याचं सांगत, इतर मागण्याही मान्य केल्याचा दावा केला आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व विभागांशी चर्चा करून रिक्त पदांचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर नोकरभरती सुरू करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. आश्रमशाळांमधील भोजनाचा दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध अडचणींवरही लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.