
Sambhajinagar
२५ वर्षापासून सिडको वाळूज महानगर भागात राहणाऱ्या नागरिकांना ८ दिवसाला पाणी पुरवठा होतो.८ दिवसाला होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेस पाणी मिळत नाही.पाण्यासाठी अनेक कामगारांना कामावर सुट्या माराव्या लागतात. यामुळे संतप्त झालेले नागरिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले आहेत.अभियंत्यांच्या कार्यालयासोमार महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला नाही तर आक्रमक आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. .