राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांवर मागणी नसताना स्मार्ट मीटर लादण्याची भूमिका घेतली असून याला सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. स्मार्ट मीटरची सक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा असून या विरोधात एक सप्टेंबर रोजी सांगलीमध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंतिम तयारी झाली आहे. दरम्यान राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आमदार खासदारांची तोंडे बंद केली आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर राज्य सरकार दरोडा टाकत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांचा या मोर्चाच्या माध्यमातून तीव्र निषेध आणि धिक्कार करणार असून राज्य सरकारने जुन्या मीटर बाबत कोणतीही तक्रार नसताना स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास कायदा हातात घेऊन जाब विचारण्याची वेळ आणू नये, असा इशारा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे अध्यक्ष चंदन दादा चव्हाण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिलाय.
राज्य सरकारने राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांवर मागणी नसताना स्मार्ट मीटर लादण्याची भूमिका घेतली असून याला सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे. स्मार्ट मीटरची सक्ती म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा असून या विरोधात एक सप्टेंबर रोजी सांगलीमध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंतिम तयारी झाली आहे. दरम्यान राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आमदार खासदारांची तोंडे बंद केली आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर राज्य सरकार दरोडा टाकत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणाऱ्यांचा या मोर्चाच्या माध्यमातून तीव्र निषेध आणि धिक्कार करणार असून राज्य सरकारने जुन्या मीटर बाबत कोणतीही तक्रार नसताना स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास कायदा हातात घेऊन जाब विचारण्याची वेळ आणू नये, असा इशारा स्मार्ट मीटर हटाव कृती समितीचे अध्यक्ष चंदन दादा चव्हाण आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी दिलाय.