राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी कधीच एकत्र नव्हती, त्यांच्यात कधीच एकवाक्यता नव्हती, असा घणाघात करत त्यांनी विरोधकांतील विसंवाद अधोरेखित केला. शिवसेनेच्या कामगिरीबाबत बोलताना शिरसाठ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ८० पैकी ६० जागा जिंकल्या. परिवर्तनाची लाट सुरू झाली असून ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही. पक्षात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याचा दावा करत, त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या उमेदवारीवरून बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेद अधिक तीव्र असल्याचे सांगितले. काँग्रेसला उमेदवार जाहीर होईपर्यंत माहितीही दिली गेली नाही. हा काँग्रेसचा अपमान आहे, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करत मंत्री संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी कधीच एकत्र नव्हती, त्यांच्यात कधीच एकवाक्यता नव्हती, असा घणाघात करत त्यांनी विरोधकांतील विसंवाद अधोरेखित केला. शिवसेनेच्या कामगिरीबाबत बोलताना शिरसाठ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ८० पैकी ६० जागा जिंकल्या. परिवर्तनाची लाट सुरू झाली असून ‘ऑपरेशन टायगर’ची गरजच नाही. पक्षात दररोज मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याचा दावा करत, त्याचा परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या उमेदवारीवरून बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेद अधिक तीव्र असल्याचे सांगितले. काँग्रेसला उमेदवार जाहीर होईपर्यंत माहितीही दिली गेली नाही. हा काँग्रेसचा अपमान आहे, असे ते म्हणाले. तसेच काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले.