सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, महाबळेश्वर-पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात फुललेली सफरचंद बाग सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.सफरचंद उत्पादक शेतकरी बापू भिलारे यांच्या या यशस्वी प्रयोगाला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या प्रयोगाची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बापू भिलारे यांच्या जिद्दीचे आणि आधुनिक शेती प्रयोगाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन केले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्ता, चव आणि उत्पादन क्षमतेचेही कौतुक केले.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाराष्ट्रातील वातावरण विविध फळपिकांसाठी पोषक असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावे, असे आवाहन केले तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांनी या सफरचंद बागेला आवर्जून भेट द्यावी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा ठरत असून, शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करणारी ठरत आहे
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात, महाबळेश्वर-पाचगणी लगत असलेल्या पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात फुललेली सफरचंद बाग सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.सफरचंद उत्पादक शेतकरी बापू भिलारे यांच्या या यशस्वी प्रयोगाला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या प्रयोगाची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बापू भिलारे यांच्या जिद्दीचे आणि आधुनिक शेती प्रयोगाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन केले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत त्याच्या गुणवत्ता, चव आणि उत्पादन क्षमतेचेही कौतुक केले.यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाराष्ट्रातील वातावरण विविध फळपिकांसाठी पोषक असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगशील शेतीकडे वळावे, असे आवाहन केले तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांनी या सफरचंद बागेला आवर्जून भेट द्यावी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घ्यावी, असेही यावेळी सांगण्यात आले.पसरणीत फुललेली ही सफरचंद बाग आता साताऱ्यातील प्रगतशील शेतीचा नवा चेहरा ठरत असून, शेतकऱ्यांच्या जिद्दीला सलाम करणारी ठरत आहे