
Viral : "भारतीय म्हणून मरायचे आहे", ९४ वर्षीय महिलेने अमेरिकन नागरिकत्वाचा त्याग करत संविधानाची घेतली शपथ
भारतात मरण येण्याची इच्छा
महिलेचे नाव कोंड्रागुंटा महालक्ष्मम्मा असून तिचे वय ९४ वर्षे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीम्मा यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या संयुक्त अमेरिका येथे निघून गेल्या. तिथे त्यांचा मुलगा बुचैया चौधरी, व्हर्जिनियातील पीटर्सबर्ग येथे कर्करोगतज्ज्ञ म्हणून काम करतो. २००० साली महालक्ष्मीम्मा यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालं. सलग १८ वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर २०१८ मध्ये महालक्ष्मीम्माला भारतात पुन्हा परतल्या, त्यांच्या मुलाला मंगलागिरीच्या एका एनआरआय रुग्णालयात काम मिळाले होते.
अधिकाऱ्यांना केली अपील
दरम्यान कोंड्रागुंटा महालक्ष्मम्माने भारतीय नागरित्व मिळवण्यासाठी अर्ज केला असून प्रक्रियेत वेगाने होण्यासाठी त्यांनी अधकाऱ्यांची भेट देखील घेतली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, ही ९४ वर्षीय महिला आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यातील चिनागंजम मंडलातील चिंथागुम्पाला गावची रहिवासी आहे. बुधवारी त्यांनी बापटला जिल्ह्यातील कलेक्टर वेंकट मुरली यांची भेट घेतली. आपल्या मुलासोबत त्यांनी येऊन त्यांनी जिल्हा कलेक्टरांना लवकरात लवकर भारतीय नागरित्व देण्याची विनंती केली. यावेळी महालक्ष्मम्माने अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आधीच आपले अमेरिकन नागरित्व सोडून दिले असून आता पुन्हा एकदा त्यांना भारतीय नागरित्व हवे आहे.
“I WANT TO DIE AS AN INDIAN”: 94-YEAR-OLD GIVES UP US CITIZENSHIP Woman from Andhra Pradesh has renounced her US citizenship and appealed to authorities to restore her Indian citizenship, saying her final wish is to spend the rest of her life in her motherland Kondragunta… pic.twitter.com/b0OYSloGBD — Nabila Jamal (@nabilajamal_) June 26, 2026
शेवटचे दिवस मातृभूमीत घालवावे…
महिलेने कलेक्टर यांच्याशी संवाद साधताना त्यांना सांगितले की, “कलेक्टर सर, माझे वय ९५ वर्ष आहे. माझी एकच इच्छाी आहे की आपले शेवटचे दिवस मी माझ्या मातृभूमीत भारतीय नागरिक बनून घालवावे. माझे अंतिम संस्कार हे माझ्या मूळ गावी व्हावेत अशी माझी इच्छा आहे. कृपया तुम्ही लवकरात लवकर भारतीय नागरित्व देण्यात माझी मदत करावी”. महिलेने यावेळी ती संविधानाचा सन्मान करुन सर्व नियमांचे पालन करेल असे आश्वासन देखील अधिकाऱ्यांना दिले. याच्या उत्तरात आता जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेच्या विनंतीचा मान ठेवत सांगितले की, प्रमाणित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही केली जाईल. तसेच नागरिकत्वासाठी अंतिम शिफारस केंद्रीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यापूर्वी स्थानिक तपासाचे निष्कर्ष राज्य सरकारकडे सादर करण्यात येण्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.