
मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात 'हे' शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य
रुग्णांनी काय सांगितलं?
अनेका रुग्णांनी दावा केली की, हृदयाचे ठोके थांबलयानंतरही त्यांना सभोवतालचा आवाज ऐकू येत होता. बहुतेक लोकांना जवळजवळ सारखेच आवाज ऐकू येत होते. अनेक रुग्णांनी सांगितले की, त्यांना डॉक्टर ‘मृत्यूची वेळ झाली आहे,’ ‘आम्ही त्याला गमावले आहे,’ ‘तो गेला आहे,’ किंवा ‘मृत्यूची वेळ जाहीर करा’ यांसारखी वाक्ये बोलताना ऐकू येत होती. याचाच अर्थ ते डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांना हे आवाज ऐकू येत होते. यावरुन असे स्पष्ट होते की, मृत्यूनंतरही काहीकाळ व्यक्तीची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होत नाही. यात काही रुग्णांचे अनुभव तर फारच रंजक होते. आपले अनुभव सांगताना त्यानी वर्णन केले की, त्यांनी त्यावेळी असे वाटले जणू त्यांच्या शरीरापासून ते वेगळे झाले आहेत आणि सर्वकाही वरुन पाहत होते. त्यांनी डाॅक्टरांना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना पाहिले आणि त्यांचे संभाषण देखील ऐकले.
हे अनुभव ऐकायला विचित्र वाटत असले तरी संशोधकांच्या मते, ते भ्रम किंवा कल्पना नसू शकतात. पूर्वीच्या काळी असं मानलं जातं होतं की, हृदय थांबल्यानंतरही मेंदू काहीवेळंच सक्रिय राहतो आणि मग त्याला नुकसान पोहचते. परंतु नवीन अभ्यासाने मात्र या धारणेला आव्हान दिले आहे. यात असे आढळून आले आहे की, हृदय थांबल्यानंतरही मेंदू मात्र काही काळ सक्रिय राहू शकतो. अभ्यासात असे आढळले की, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आपला मेंदू एका विशिष्ट अवस्थत पोहचतो ज्याला सूपर फोकस स्टेट असे म्हटले जाऊ शकते. या अवस्थेत व्यक्तीला आपल्या आजूबाजूचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. रुग्णांचे अनुभव हे स्पष्ट करतात की मृत्यूनंतर चेतना पूर्णपणे नाहीशी होत नाही तर त्याऐवजी ती वेगळ्या प्रकार सक्रिय होऊ शकते. हा अभ्यास मृत्यूपूर्वीच्या अनेक गोष्टींचे वर्णन करतो ज्याविषयी याआधी आपण कधीच ऐकलं नाही.