
खऱ्या आयुष्यात घडून आला चित्रपटाचा सीन! मेहंदीच्या रात्री आगीत जळाली नवरी, वराने रुग्णालयात बांधली लग्नगाठ; Video Viral लग्नाच्या काही दिवसांआधी घडलेल्या अपघातामुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले. गंभीर परिस्थितीतही दोन्ही कुटुंबांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही घटना सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्सकडून मिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. शाहिद कपूर आणि अमृता राव यांचा 'विवाह' हा सूपरहिट चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर यातील शेवटचा सीन तुम्हाला माहिती असेलच. लग्नाच्या आदल्या दिवशी घराला आग लागल्याने यात हिरोईन घायाळ होते आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागते. होणाऱ्या बायकोच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत याचा विचार न करता हिरो प्रामिणिकपणे रुग्णालयातच तिच्यासोबत लग्नगाठ बांधतो आणि तिला आपली अर्धांगिणी म्हणून स्वीकारतो. अशीच काहीशी घटना आता सत्यात घडून आली आहे जिचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया. काय आहे प्रकरण? माहितीनुसार, १४ मे रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील घाटमपुर ठाणा परिसरात श्वेता नावाच्या मुलीचा विवाह होणार होता. पण याच्या काही दिवसांआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सांगण्यात येत आहे की, लग्नाच्या काही दिवसांआधीच मेहंदीचा सोहळा सुरु असताना लग्नाच्या घरात आग लागली. ही आग गॅस सिलेंडर पाईपमध्ये लिकेजमुळे लागल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि यादरम्यानच गरम तेलाची कढई तब्बल १२ लोकांवर पलटली ज्यामुळे ते घायाळ झाले. यात होणाऱ्या नवरीचाही समावेश होता. ही घटना जगन्नाथपुर गावात घडली आहे. या घटनेनंतर सर्व जखमींना घाटमपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीररित्या घायाळ झालेल्या श्वेताला कानपुरच्या एका प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता ही घटना जेव्हा होणारा नवरा विकास सिंह याला समजली तेव्हा तो तात्काळ रुग्णालयात दाखल झाला. परिस्थिती पाहता कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला पण विकसने त्याला नकार दिला. काहीही झाले तरी वचन पाळले जाईल आणि श्वेताला स्वीकारले जाईल असे त्याने सांगितले. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी हाॅस्पिटलची परवानगी घेतली. वार्डला फुलांनी सजवण्यात आले आणि पुन्हा एकदा लग्नाची लगबग सुरु होऊन रुग्णालयात त्यांच लग्न पार पाडण्यात आलं. सोशल मिडियावर याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. या घटनेचा व्हिडिओ @amshilparaghu नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इथे शौर्य वगैरेसारखी कोणतीही भंपक गोष्ट नाही; तर्काच्या दृष्टीने पाहता, परिस्थिती निवळण्याची वाट पाहणे हेच योग्य ठरले असते. तरीही, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला- पण तसे केले तरीही, वास्तवात काहीच बदलत नाही. लोक श्रेय देण्यासाठी काहीही कारण शोधण्याचा प्रयत्न करतात; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, सर्व काही सुरक्षित असायले हवे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ बहुतेक विवाह-२ चा सिक्वेल तयार करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आधी वधूला सावरू द्या. ही काही प्रेमाची कृती नाही, की अपरिपक्वतेचे लक्षणही नाही”. Marriage At Hospital : विवाह चित्रपटाचा सीन खऱ्या आयुष्यात घडून आला. मेहंदीच्या दिवशी लग्नघरात आग लागल्याने नवरीसह अनेकजण जखमी झाले. अशात नवऱ्याने आपली प्रामाणिकता दाखवत रुग्णालयातच ठरल्या दिवशी लग्नगाठ बांधली.
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, १४ मे रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील घाटमपुर ठाणा परिसरात श्वेता नावाच्या मुलीचा विवाह होणार होता. पण याच्या काही दिवसांआधीच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सांगण्यात येत आहे की, लग्नाच्या काही दिवसांआधीच मेहंदीचा सोहळा सुरु असताना लग्नाच्या घरात आग लागली. ही आग गॅस सिलेंडर पाईपमध्ये लिकेजमुळे लागल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि यादरम्यानच गरम तेलाची कढई तब्बल १२ लोकांवर पलटली ज्यामुळे ते घायाळ झाले. यात होणाऱ्या नवरीचाही समावेश होता. ही घटना जगन्नाथपुर गावात घडली आहे.
या घटनेनंतर सर्व जखमींना घाटमपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीररित्या घायाळ झालेल्या श्वेताला कानपुरच्या एका प्रायव्हेट हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता ही घटना जेव्हा होणारा नवरा विकास सिंह याला समजली तेव्हा तो तात्काळ रुग्णालयात दाखल झाला. परिस्थिती पाहता कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला पण विकसने त्याला नकार दिला. काहीही झाले तरी वचन पाळले जाईल आणि श्वेताला स्वीकारले जाईल असे त्याने सांगितले. यानंतर दोन्ही कुटुंबियांनी हाॅस्पिटलची परवानगी घेतली. वार्डला फुलांनी सजवण्यात आले आणि पुन्हा एकदा लग्नाची लगबग सुरु होऊन रुग्णालयात त्यांच लग्न पार पाडण्यात आलं. सोशल मिडियावर याचे काही फोटोज शेअर करण्यात आले आहेत जे सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.
This groom showed his true character did something unexpected ❤️ During the Haldi ceremony in Ghatampur, Kanpur, a gas cylinder leaked, fire broke out, and hot oil spilled everywhere. The bride Shweta and 11 other relatives got badly burnt and were rushed to the hospital. But… pic.twitter.com/0KriQ4mEJq — Aparajite (@amshilparaghu) May 16, 2026
या घटनेचा व्हिडिओ @amshilparaghu नावाच्या एक्स अकाऊंवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “इथे शौर्य वगैरेसारखी कोणतीही भंपक गोष्ट नाही; तर्काच्या दृष्टीने पाहता, परिस्थिती निवळण्याची वाट पाहणे हेच योग्य ठरले असते. तरीही, त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला- पण तसे केले तरीही, वास्तवात काहीच बदलत नाही. लोक श्रेय देण्यासाठी काहीही कारण शोधण्याचा प्रयत्न करतात; पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, सर्व काही सुरक्षित असायले हवे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ बहुतेक विवाह-२ चा सिक्वेल तयार करत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आधी वधूला सावरू द्या. ही काही प्रेमाची कृती नाही, की अपरिपक्वतेचे लक्षणही नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.